मारहाण करणारे तिघे अटकेत

पत्नीशी बोलत असल्याच्या रागातून पतीसह तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात जखमी तरुणाने फिर्याद दिली. यानुसार करवीर पोलिसांनी बुधवारी दुपारी तिघांना अटक केली. संदीप गणपती पाटील (३५, रा. आसुर्ले, ता. पन्हाळा), बाळासाहेब लक्ष्मण पाटील (४५, रा. वडणगे पाडळी), जयसिंग तानाजी माने (३८, रा. केर्ले) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. यांनी केलेल्या मारहाणीत जितेंद्र बाजीराव जाधव (३४, रा. दरेवाडी, ता. पन्हाळा) जखमी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *