माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुलं: भिडे

नाशिक

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असा दावा शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे  यांनी केला. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भिडे यांचे वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असल्याची टीका होत आहे.

रविवारी संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली. या सभेत त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केलीत. माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही बाब फक्त आईलाच सांगितली होती. आता तुम्हाला सांगत असल्याचे भिडे यांनी सभेत म्हटले.

अहमदनगर आणि नाशिक येथील सभेत संभाजी भिडे यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यात अपत्यप्राप्तीच्या या दाव्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *