राज्यात १ जूनपासून पुन्हा शेतकरी आंदोलन

शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व संपाला एक वर्ष पूर्ण होत आले तरी त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्याच मागण्यांसाठी येत्या १ जूनपासून राज्यात पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी प्रहार, किसान सभा व लाखगंगा आंदोलकांनी सर्व दूध उत्पादक जिल्ह्यांतील तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून व सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्यात येणार आहे. लाखगंगा येथे झालेल्या ग्रामसभेत आ. बच्चू कडू, डॉ. अजित नवले, धनंजय धोरडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

शेतकरी प्रश्नांवर किसान क्रांती जन आंदोलनाने १ जूनपासून पुकारलेले आंदोलन सरकार पुरस्कृत आहे, असा आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे नेते रघुनाथ पाटील यांच्यासह समन्वयक सुभाष लोमटे यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘शेतकरी संप फोडण्याचे काम केलेल्यांनीच हे आंदोलन पुकारले आहे. त्यांना समितीचा पाठिंबा नाही’, असे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *