‘बुलेट ट्रेनला एक इंचही जमीन देणार नाही’

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानची बुलेट ट्रेन हा केवळ धनदांडग्यांसाठी आखलेला राजमार्ग आहे, अशी टीका करीत, त्यासाठी एक इंचही जमीन आम्ही घेऊ देणार नाही, असा इशारा किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी गुरुवारी दिला.

बुलेट ट्रेनला विरोध करण्यासाठी डहाणू येथे गुरुवारी निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. नंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. पालघर, तसेच ठाणे जिल्ह्यातून सुमारे ३० हजार शेतकरी, कामगार, महिला व तरुण या मोर्चात सहभागी झाले होते. शेतीवर उदरनिर्वाह करीत असलेल्या जमिनींचे संपादन करून शेतकऱ्यांना भूमीहीन, बेरोजगार बनवण्याचे केंद्रातील व राज्यातील सरकारचे कारस्थान आहे, असे टीकास्त्र डॉ. ढवळे यांनी सोडले. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी, मोदी सरकारने जीएसटी व नोटाबंदी आणून हजारो लोकांना बेरोजगार केले, अशी टिका केली. शेकाप आमदार जयंत पाटील यांनीही यावेळी सरकारवर हल्ला केला. या मोर्चाच्या तुलनेत पोलिसव्यवस्था अपुरी पडल्याने वाहतुकीचा पार बोजवारा उडाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *