काश्मीरमध्ये पाच पाकिस्तानी सैनिक ठार

काश्मीरमध्ये वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानला आज भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. पुंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले असून २० नागरिक जखमी झाले आहेत.

आज पहाटे पुंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असता त्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ५ सैनिक ठार झाले असून २० पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत. यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानचे ३ बंकरही उद्ध्वस्त केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुंदरबनी आणि देहगांव येथे पाकिस्तानी सैनिकांना ठार मारण्यात आले आहे. या परिसरात पाकिस्तानची NLI Unit तैनात होती. याशिवाय जम्मू-काश्मीरच्या त्राल येथील लाम गावात आज पहाटे भारतीय जवान आणि पाकिस्तानी सैनिकांदरम्यान प्रचंड गोळीबार झाल्याचंही वृत्त आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *