मुंबईत ८ महिन्यांत १ लाख उंदीर मारले!

मुंबई महापालिकेनं उंदरांना पकडण्यासाठी ‘खास’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत एक लाखांहून अधिक उंदीर मारले आहेत. नवी मुंबईतही ही मोहीम हाती घेतली आहे.

उंदरांमुळं अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिससारखे गंभीर आजारही होऊ शकतात. नागरिकांचं आरोग्य धोक्यात असल्याचं लक्षात घेऊन महापालिकेनं उंदीर मारण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आठ महिन्यांत १ लाख ९ हजार २१३ उंदीर मारले आहेत. यानुसार मुंबईत रोज जवळपास ४५० उंदीर मारले जात आहेत. नवी मुंबईतही उंदरांचा सुळसुळाट आहे. महापालिकेचं मुख्यालयही उंदरांमुळं त्रस्त आहे.

पालिकेचे कर्मचारी आधी उंदरांची ठिकाणं शोधून काढतात. त्यानंतर तेथे विशेष खूण केली जाते. ज्या ठिकाणी उंदीर मोठ्या प्रमाणात आहेत, तेथे विषारी गोळ्या ठेवल्या जातात. या गोळ्या खाल्ल्यानं उंदीर मरतात. याशिवाय नागरिकांकडून तक्रारी मिळाल्यानंतरही त्या-त्या विभागात जाऊन कार्यवाही केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *