निवडणुकीदरम्यान सत्तेत आल्यानंतर टोल रद्द करु असे आश्वानस देणा-या केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सत्तेत आल्यानंतर मात्र यू टर्न घेतला आहे.
निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान ‘टोलचा खेळ मी सुरु केला, तो मीच संपवणार’ असे आश्वासन गडकरींनी दिले होते. मात्र आता टोल पूर्णपणे बंद करता येणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या विधानावरुन घुमजाव केले आहे.
एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी इतर काही मुद्दयांवरही भाष्य केले. नागरिकांना चांगले रस्ते हवे असल्यास टोल चालू राहणारच असे गडकरींनी यावेळी स्पष्ट केले.