येथील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचं काम सध्या प्रगतीपथावर असून 2018 मध्ये या विमानतळाची सेवा सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिलीय.
या विमानतळासाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे कामाला थोडा विलंब झाल्याची कबुली अधिका-यांनी दिली आहे. मात्र कामाला वेग आला असून २०२० पासून २४तास विमानसेवा रत्नागिरीकरांना उपलब्ध होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिली आहे.
कोकणातून विमान सेवा सुरु झाली तर नक्कीच याचा फायदा हा कोकणच्या विकासासाठी होईल. पर्यटक मोठ्या संख्येने कोकणाकडे वळतील.
