कल्याणजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले; पोलिसांची वाहने जाळली

कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची धग शमते न शमते तोच आता मुंबईपासून जवळच असलेल्या कल्याणजवळील शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. सरकारने जबरदस्तीने नेवाळी विमानतळासाठी जमिनी संपादित केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन मार्गावरील वाहतूक रोखून धरली. तसंच पोलिसांची वाहने पेटवली.

कल्याणजवळील नेवाळीजवळील विमानतळाच्या जागेचा प्रश्न चिघळला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांना ने-आण करण्यासाठी आणि मालवाहू विमाने उतरवण्यासाठी ब्रिटिशांनी नेवाळी येथे विमानतळ सुरू केले होते. या विमानतळासाठी ब्रिटिशांनी त्यावेळी शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केल्या होत्या. काही वर्षांनी त्या जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आल्या होत्या. पण आता या जमिनी नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं गेल्या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. यावर्षी नौदलानं या जागेवर दावा करत तिथं कुंपण टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याला
शेतकऱ्यांनी विरोध केला असून, आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन मार्गावर आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगगड रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. तसेच वाहनांचे टायर जाळून मलंगगडकडे जाणारी वाहतूक रोखली. पोलिसांची वाहनेही पेटवली. तसेच पोलिसांवर दगडफेकही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *