नाशिकमध्ये शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाला सुरुवात

शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी प्रास्तविक करताना शिवसेनेच्या केंद्रस्थानी शेतकरी असल्याचे सांगितले. शेतकरी आत्महत्या दुख:द असून त्यावर कर्जमुक्तीचाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफीची गरज असल्याचे ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री दादा भूसे, खासदार  संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विजय शिवतारे व शेतकरी यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *