भारताला पुन्हा २६/११ सारख्या हल्ल्याचा धोका

पाकिस्तानात तळ ठोकून असलेल्या दहशतवादी संघटना भारतावर पुन्हा २६/११ सारखा हल्ला करू शकतात आणि दशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याला निपटून काढणे भारतासाठी महाकठीण होईल, असा इशारा देण्यात आला आहे. ब्रुसेल्स येथील थिंक टँक इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने सादर केलेल्या एका अहवालात हा इशारा दिला आहे.

या ग्रुपने दक्षिण आशियामधील अमेरिकेच्या दहशवादविरोधी धोरणावरील एक अहवाल जारी केला आहे. त्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन दहशतवादी संघटनांकडून भारत आणि अमेरिकेलाही धोका आहे. या दोन्ही संघटनांचा अल कायदाशी संबंध नाही. परंतू त्यांचे दहशतवादी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या जेहादी संघटनेशी संबंधित आहे. ते भारतावर हल्ला करून पाकिस्तान आणि अमेरिकेलाही धोका निर्माण करू शकतात, असं या अहवालात म्हटलं आहे.

मात्र भारतावर हल्ला झाल्यास हा हल्ला परतवून लावणे भारताला अवघड होणार असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. भारताबरोबर रणनिती आखूनच लष्कर आणि जैशसारख्या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले जाऊ शकते, असंही या अहवालात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *