तीन वषार्पूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून अख्ख गाव नाहीसे झाले होते. कोलंबियात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली.
मुसळधार पावसामुळे ऐन मध्यरात्री डोंगर खचून गावावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत २०६ जणांचा मृत्यु झाला असून शेकडो जण बेपत्ता आहेत, अशी माहिती मिळत आहे.
कोलंबियान सरकारने ही दुर्घटना राष्ट्रीय आपत्ती असल्याचे घोषित केले आहे.
कोलंबियाच्या दक्षिण भागात अमेझॉन नदीच्या परिसरात असलेले मोकोआ हे ४० हजार लोक वसतीचे गाव आहे. पण शुक्रवारी रात्री १३० मिलिमीटर इतका तुफान पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे मोकोआ नदीला पूर आला. या पुरामुळे रात्रीच्या अंधारात काळ कोसळावा तसा डोंगर खचला आणि चिखल-मातीच्या ढिगा्याखाली हे गाव सापडले.
आता तिथे फक्त चिखल मोठ-मोठे दगडं, वाहून आलेली झाडं आणि गाड्यांचे सांगाडे दिसत आहेत. जवळपास अख्ख गाव दिसेनासं झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर २०२ जण जखमी असून २२० जण बेपत्ता असल्याची माहिती रेड क्रॉसने दिली आहे.