मुंबईच्या दिशेने पहिली लोकल रवाना

तब्बल सव्वा तीन तासानंतर बदलापूरहून मुंबईच्या दिशेनं  पहिली लोकल रवाना  झालीय. सकाळी सहा वाजता विठ्ठलवाडी आणि कल्याणच्या मध्ये कुर्ला अंबरनाथ गाडीचे पाच डबे घसरले आहेत. त्यामुळे सकाळपासून कर्जतकडून कल्याणकडे येणारी आणि कल्याणकडून अंबरनाथ, बदलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प होती.

कुर्ला अंबरनाथ दरम्यान लोकल गाडी घसरल्यानंतर कर्जत आणि कसारा मार्गावरील वाहतूक चार तासांपासून खोळंबली आहे.

मात्र पहिली लोकल रवाना झाली असली, तरी पुढील वाहतूक अजूनही पूर्ववत होण्यास उशीर होत आहे.

ही पहिली गाडी रवाना करण्याचं कारण, रेल्वे रूळ पूर्ववत करण्यासाठी काही सामान रेल्वेला ट्रॅकपर्यंत आणावं लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *