म्हणे ‘सर्जिकल’ला चोख उत्तर दिले असते

‘उरी’ दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. यात लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र पाकिस्तानकडून वारंवार भारताच्या ‘सर्जिकल’ला नाकारले जात आहे. आता पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनाही सर्जिकल स्ट्राईक झालेच नाही, असे म्हंटले आहे.

‘२९ सप्टेंबरला भारताकडून कोणतेही सर्जिकल स्ट्राईक झालेले नाही. जर भारताने असे कोणतेही कृत्य केले असते, तर पाकिस्तानने त्याला चोख प्रत्युत्तर दिले असते’ असे पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांचे म्हणणे आहे. सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा म्हणून जो व्हिडिओ व्हायरल केले जात आहे तो बनावट आहे असेही ते म्हणाले. एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *