येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बाजारपेठेतील गांधी मोबाईल शॉपीला आग लागण्याची घटना घडली. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या दुर्घटनेत अंदाजे १ कोटीचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
पंढरपूरच्या मुख्य बाजारपेठेत मोहन जवाहर गांधी यांचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. आठ दिवसांपूर्वीच या दुकानाचे उद्घाटन झाले होते. मात्र गुरुवारी पहाटे अचानकपणे गांधी मोबाईल शॉपीला आग लागण्याची घटना घडली. या आगीत किमती मोबाईल फोन्स, फर्निचर आदी जळून खाक झाले.