मराठवाड्यामध्ये तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यावर विविध योजनांची खैरात केली आहे. मराठवाड्याच्या विकासाला गती मिळावी व येथील प्रश्नांना दिशा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी विविध विकासकामांबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मराठवाड्यात एक लाख घरे बांधणे, अहमदनगर-बीड रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करणे, लातूर, जालना येथे आभियांत्रिक महाविद्यालय उभारणे, जालन्याला सीड पार्क उभारणे, ९ हजार २९१ कोटींच्या सिंचन कामास मंजुरी देणे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याची गरज नसून जिल्हाधिकाऱ्यांची समिती नुकसान ठरवणार असल्याचे सांगत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.