भारत -पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत झालेली तीन युद्धे आणि ताणलेले संबंध या पार्श्वभूमीवर गेल्या काही दशकांपासून उभय देशांमध्ये असलेल्या पाणी वाटप कराराचे पुनर्रावलोकन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीचे पंतप्रधान अध्यक्षस्थान भूषवणार असून पाणीवाटप करारात ते जातीने लक्ष घालतील, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
19 सप्टेंबर 1960 रोजी भारत -पाक यांच्यात झालेला पाणीवाटप करार हा जगातील सर्वात उदारमतवादी करार मानला जातो. रावी, सतलज, इंडस, चिनाब व झेलम यांच्यातील पाणीवाटपाबाबतच्या करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरु व पाकचे तत्कालीन अध्यक्ष अयुब खान यांनी स्वाक्षर्या केल्या होत्या.