अर्थपूर्ण लसूण शेती

अर्थपूर्ण लसूण शेती

लसणाची नेमकी उत्पत्ती कुठे झाली याला निश्चित आधार नाही. प्रत्येक खंडातील लोक आमच्या येथेच लसूण पहिल्यांदा उत्पादित झाला असा दावा करतात. देव-दानवांच्या युद्धात राहूने चोरून अमृत प्राशन केले. त्याचा गळा कापल्यानंतर जे अमृताचे कण पडले त्यातून लसणाची उत्पत्ती झाली अशी आख्यायिका सांगितले जाते. लसणाला संस्कृतमध्ये रसोण (रस+उणे) असे संबोधले जाते. लसूण हे कांद्याप्रमाणेच कंदवर्गीय पीक आहे. एका लसणाच्या गड्डय़ात २० ते २५ पाकळय़ा असतात व प्रत्येक पाकळीला स्वतंत्र आवरण असते. सर्दी, खोकला, फुप्फुसाच्या आजारावर रामबाण औषध म्हणून लसूण वापरली जाते.

गावरान व संकरित असे लसणाचे ढोबळ दोन प्रकार आहेत. देशभरात अनेक ठिकाणी लसूण संशोधन केंद्रेही अस्तित्वात असून तेथे लसणाच्या विविध जाती निर्माण केल्या जात आहेत. सरासरी एका एकरला ६ ते ८ क्विंटल लसणाचे बियाणे लागते. लावणीपूर्वी जमीन नांगरणे, पाळी घालणे व काही ठिकाणी पाऊस पडला नाही तर पाणी देऊन लसूण लावला जातो. काही शेतकरी सुरुवातीला रोप तयार करून त्यानंतर त्याची लावण करतात, तर काही जण थेट पेरणी यंत्राद्वारे लसूण पेरतात. जमिनीत २ ते ४ सेंमी खाली लसणाचे बी गेले पाहिजे. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी, तर दोन रोपांतील १५ सेंटिमीटर असणे अपेक्षित आहे. आधुनिक पद्धतीने शेती करणारी मंडळी अन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, जमिनीतील ओल कमी होऊ नये यासाठी मल्चिंग पेपरचाही वापर करतात. लसणाला सिंचनाची सोय आवश्यक आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असल्यामुळे आता बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनाद्वारेच लसणाची शेती करतात.

  • सरासरी एकरी ४ ते ६ टन उत्पादन महाराष्ट्रात मिळते.
  • हेक्टरी उत्पादgarकता १२ टनांच्या आसपास आहे. गुजरातची उत्पादकताही २५ टनांपेक्षा अधिक आहे.
  • एकूण देशाची उत्पादकता ही १६ टन आहे. जगभरात चीन, इजिप्त, फ्रान्स, स्पेन, अमेरिका या देशांत लसणाचे उत्पादन घेतले जाते.
  • जगाच्या तुलनेत आपल्या देशातील उत्पादकता अतिशय कमी आहे. गतवर्षी चीनमध्ये साडेआठ लाख हेक्टरवर लसणाची शेती करून २०० लाख टन उत्पादन काढण्यात आले. या तुलनेत भारतात २.०२ लाख हेक्टरवर लसणाची लागवड झाली व उत्पन्न मिळाले साडेअकरा टन.
  • जगाच्या तुलनेत गुजरात प्रांतातील शेतकरी लसणाचे उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने घेतात.
  • लसणाच्या अत्याधुनिक प्रजातीची लागवड करून त्याद्वारे अधिकाधिक उत्पादन घेत व हे उत्पादन निर्यात करण्यावर तेथील शेतकऱ्यांचा भर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *