शंभर जणांना जमवण्यासाठी लागणार परवानगी?

शंभर पेक्षा अधिक लोकांचा सहभाग असलेला समारंभ, मेळावा, सार्वजनिक सभा इत्यादीसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य होण्याची शक्‍यता आहे. राज्यातील अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र प्रोटेक्‍शन ऑफ इंटरनल सेक्‍युरिटी (मापिसा) – 2016 या नव्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे.

या नव्या कायद्याच्या प्रस्तावाच्या मसुद्यातील काही प्रमुख बाबी –

  • अंतर्गत सुरक्षेशी संबंधित संस्था/आस्थापना/प्रकल्पाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात येणार.
  • मॉल, रेल्वेस्थानके, विविध सार्वजनिक ठिकाणे, विमानतळे, एसटी बसस्थानके, धरणे, तलाव व पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या इ. सर्व सार्वजनिक ठिकाणावर सुरक्षा तपासणी सक्तीची करण्यात येणार.
  • सुरक्षेचा धोका पोचविणाऱ्या/कुचराई करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात येणार.

तसेच या कायद्यामुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा व्यवस्था या कायद्यामुळे वाढणार असल्याचेही मसुद्यामध्ये म्हटले आहे. या नव्या मापिसा – 2016 कायद्याचा प्रस्तावित मसुदा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध करून दिला आहे. तसेच त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचनाही मागविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *