उत्तर-पूर्व भारतात भूकंपाचे तीव्र धक्के

उत्तर आणि पूर्व भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.७ रिश्टर स्केल एवढी होती.

हा भूकंप स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी चार वाजून चार मिनिटांनी झाल्याची माहिती अमेरिकेच्या भूगर्भ शास्त्र सर्वेक्षण विभागाने दिली. तर म्यानमारमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटणा, झारखंडची राजधानी रांची आणि आसाममधील गुवाहाटीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.  आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंडमध्येही हे धक्के जाणवले आहेत.

या भूकंपामुळे कोणतीही जिवीत वा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *