गणपतीत कोकणात जाणा-या गाड्यांचा टोल माफ करा- नितेश राणे

मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे गणपतीत कोकणात जाण्यासाठी भाविक मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करणार आहेत.

तेव्हा या भाविकांकडून मुंबई-पुणे महामार्गावर टोल घेऊ नये, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे.

सरकारने खड्डे बुजवलेले नाहीत. तेव्हा सरकारने गणपतीसाठी मुंबई-पुणे महामार्गावरून जाणा-या वाहनांकडून टोल घेऊ नये.

सरकारने ही मागणी मान्य केली तर ठीक अन्यथा कोकणी माणसांच्या हक्कांसाठी आम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल, असा इशाराही राणे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *