मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे गणपतीत कोकणात जाण्यासाठी भाविक मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करणार आहेत.
तेव्हा या भाविकांकडून मुंबई-पुणे महामार्गावर टोल घेऊ नये, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे.
सरकारने खड्डे बुजवलेले नाहीत. तेव्हा सरकारने गणपतीसाठी मुंबई-पुणे महामार्गावरून जाणा-या वाहनांकडून टोल घेऊ नये.
सरकारने ही मागणी मान्य केली तर ठीक अन्यथा कोकणी माणसांच्या हक्कांसाठी आम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल, असा इशाराही राणे यांनी दिला.