महाराष्ट्रात मोठया उत्साहात खेळल्या जाणा-या दहीहंडीत मानवी मनो-यांची उंची किती असावी, लहान मुलांना यात प्रवेश द्यावा का? याबाबत सर्वोच्च न्यायालय बुधवारी निकाल देण्याची शक्यता आहे. दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देते याकडे गोविंदा मंडळांचे लक्ष लागून राहिले आहे.
१८ वर्षाखालील मुलांना दहीहंडीत भाग घेण्यास बंदी घालतानाच मानवी मनो-याची उंची २० फुटांपेक्षा अधिक असता कामा नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिले होते. त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली, मात्र निकाल रद्दबातल ठरवला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती आहे का ? याबाबत स्पष्टीकरण करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. आर. दवे व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या पीठापुढे याबाबतची सुनावणी होणार आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे महाराष्ट्र सरकारची बाजू मांडत आहेत.