महाड दुर्घटनेतील मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेले ?

महाड दुर्घटनेत सावित्री नदीमध्ये वाहून गेलेल्या वाहनांमधील मृतदेह सापडू लागले आहेत. गुरुवारी सकाळी तीन मृतदेह सापडले असून, तीनही मृतदेह समुद्र किना-यावर सापडले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेल्याची दाट शक्यता आहे.
सर्वप्रथम जयगड-मुंबई एसटीबसचे चालक एस.एस.कांबळे यांचा मृतदेह दापोलीतील आंर्जेले समुद्र किना-यावर सापडला. घटनास्थळापासून ७० किमी अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर हरीहरेश्वर येथील समुद्र किना-यावर एका वृद्धेचा मृतदेह सापडला.
घटनास्थळापासून ८९ किमी अंतरावर दुसरा मृतदेह सापडला. तिसरा मृतदेह महाड जवळच्या केंबुर्ली गावा जवळच्या समुद्रात सापडला. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *