पतीच्या अपघाती निधनानंतर महिलेला एक वर्षं घरात डांबून ठेवल्याचं वृत्त माध्यमांत आल्यानंतर, पीडित महिलेच्या सासरच्यांनी घर सोडून पळ काढला आहे.
तीन वर्षांपूर्वी रिक्षातून प्रवास करताना पीडितेच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी, तिच्या सासरच्यांनी तिला वर्षभर एका खोलीत डांबलं होते.
ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली तेव्हा तिला सासरच्यांनी अमरावतीत माहेरी आणून सोडले. अमरावती पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र तीन दिवस उलटून गेले तरीही सासरच्यांवर कारवाई झालेली नाही. तर नांदेड पोलिसांनाही यांसदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पीडित महिला सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.