अतिरेक्यांचा निषेध निरर्थक

बांग्लादेशात गेल्या दोन वर्षांत अनेक हिंदूंवर हल्ले झाले आहेत. ज्या दिवशी आर्टिझन हॉटेलवर हल्ला झाला त्याच सुमारास बांगलादेशात अवघ्या चोवीस तासात दोन हिंदू पुजार्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. याखेरीज बांगलादेशात सुधारणावादी व पुरोगामी ब्लॉग लेखकांची हत्या करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. तेथे जातीय तणाव आहेच. हिंदूसह ख्रिश्चन, बौध्द यांच्यासारखे अल्पसंख्याकही जीव मुठीत घालूनच राहत आहेत.

बांग्लादेशात गेल्या दोन वर्षांत अनेक हिंदूंवर हल्ले झाले आहेत. ज्या दिवशी आर्टिझन हॉटेलवर हल्ला झाला त्याच सुमारास बांगलादेशात अवघ्या चोवीस तासात दोन हिंदू पुजार्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. याखेरीज बांगलादेशात सुधारणावादी व पुरोगामी ब्लॉग लेखकांची हत्या करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. तेथे जातीय तणाव आहेच. हिंदूसह ख्रिश्चन, बौध्द यांच्यासारखे अल्पसंख्याकही जीव मुठीत घालूनच राहत आहेत.

दहशतवाद मोडून काढला पाहिजे

जागतिक समुदायाने आणि सर्व धर्मियांनी वज्रमूठ करून हा दहशतवाद मोडून काढला पाहिजे आणि दहशतवाद्यांना व त्यांना पोसणाऱया शक्तींना नेस्तनाबूत करून अतिरेक्यांचा बीमोड केला पाहिजे. दहशतवाद्यांनी 20 जणांचे गळे चिरले, त्यामध्ये तरूषी जैन ही भारतीय तरूणी आहे.19 वर्षाच्या या तरूणीचे आयुष्य अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आले. 19 निरापराध नागरिकना  क्रुरतेने मारण्यात आले, त्या कृत्याचे कोणत्याही धर्मात, समर्थन होऊ शकत नाही.

ज्या कुटुंबीयांना अशा हल्ल्याची झळ पोहोचते त्यांना आयुष्यातून उठण्याची वेळ येते. त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. कोणताही दोष वा कारण नसताना अवघे कुटुंब होरपळून निघते. जनसामान्यांची सहानुभूती, अतिरेक्यांचा  झालेला निषेध, या कुटुंबीयांचे दुःख, हानी भरून काढू शकत नाही.दहशतवाद आणि धर्माचा कोणताही संबंध नाही हा विचार सर्वदूर बळावला पाहिजे. विश्व समुदायाने हातात हात घालून दहशतवादाचा बीमोड केला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *