तारळी धरण परिसर, तोंडोशीची रामघळ, जळवच्या धबधब्यांकडे पर्यटकांची पावले पावसाळा सुरू झाला की, हल्ली पर्यटनासाठी घराबाहेर पडणार्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. मग कोणी उटी, माथेरान, महाबळेश्वर तर कोणी कोकणात धाव घेतं आणि पावसात चिंब भिजत निसर्गाच्या नव्या नवलाईचं स्वागत करतं. निसर्गही मग प्रेमाने कुरवाळीत कुशीत घेऊन गुजगोष्टी गातो. अशा या हिरव्या, पिवळ्या निसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी कोठेही दूरवर जाण्याची गरज नाही. अगदी आपल्या जवळच पाटण तालुक्यातला हा बहारदार निसर्ग अनुभवण्यासाठी फक्त पावसात भिजण्याची तयारी ठेवा आणि आजच गाडी काढा आणि मनसोक्त निसर्गाचं वारं पिऊन घ्या.
उठती वरती जलदांवरती
अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय
रोखिले सुंदरतेचे रूप महा
पावसाने भिजलेले रस्ते आणि पावसाच्या थेबांनी नटलेल्या वनराईतील नागमोडी वाट म्हणजे काश्मिरच्या गुलाबी सौदर्याचा थाट वाटतो. कुठे लहरी वार्याची शिळ, कुठे कोकीळेचे मंजूळ गीत, कुठे झुळझुळणारा झरा तर कुठे उंचच्या उंच डोंगरांच्या राशी तर कुठे आपोआपच हात जोडले जातील अशी आध्यात्माची नांदी अशा सुंदर, नयनमनोहर, मनाला प्रसन्नता देणारा निसर्गाचा सहवास अनुभवण्यासाठी इथं निसर्गाने मुक्त हस्तानं उधळण करत तारळे भागाच्या झोळीत हे अमूल्य दान दिलेले आहे. त्यामुळेच आता पर्यटकांची पावले लांबलांबूनही या तालुक्याला भेटी देत आहेत.
पाटण तालुक्यातील निसर्गाचा हा ठेवा डोळ्यात साठवत असतात. तारळे, आवर्डे, घोट, मुरूड, कडवे, जळव, बांबवडे परिसरात हे तारळे खोरे विखुरलेले आहे.चारी बाजूंनी डोंंगर, निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेल्या तारळे खोर्याला निसर्गाचे अद्भुत लेणे लाभलेले आहे. भागातील आवर्डे, आंबळे, ढोरोशी, कोंजवडे, आदी गावांबरोबरच या भागांत असणार्या जळवच्या जोतिबाच्या यात्रेला हजारो भाविकांची गदीर्र् असते. त्यामुळे या भागात बाहेरच्या जिल्ह्यातून लोकांची ये जा मोठ्या प्रमाणात आहे. तारळे धरण, सडावाघापूरचे पठार, समर्थ स्थापित तोंडोशी येथील रामघळ, जळव येथील छोटे-मोठे मनमोहक धबधबे म्हणजे तारळ्याचे सौदर्य आहे. जळवच्या डोंगरात नजर टाकली की फेसाळणार्या धबधब्याने मन मोहूून निघते.