ईशान्य भारतामध्ये दोन मोठी आव्हाने आहेत. एक म्हणजे बांगलादेशी घुसखोरी… बांगलादेशी घुसखोरांना प्रतिबंध करण्यासाठी मोदी सरकार उपाययोजना करत आहे. याचाच एक भाग म्हणजे, येत्या वर्षभराच्या काळामध्ये भारत बांग्लादेश सीमा बंद करून ही घुसखोरी थांबवण्यात येणार आहे. दुसरे मोठे आव्हान आहे ते वेगवेगळ्या बंडखोर गटांचे… गृहमंत्रालयाने ३९ दहशतवादी संघटनांवर बंदी घातलेली आहे. त्यापैंकी १३ दहशतवादी संघटना या ईशान्य भारतातल्या आहेत. याखेरीज या भागामध्ये इतर ३० बंडखोर गट दहशत पसरवत असतात. याशिवाय आसाम आणि मणिपूरमधल्या २३ बंडखोर गटांनी भारत सरकारबरोबर सध्या युद्धबंदीचा करार केला आहे. मात्र त्यांचे अस्तित्व आजही आहे व हिंसाचार वाढवण्याचे सामर्थ्य आजही आहे.