बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे १० जवान शहीद झाले असून ५ गंभीर जखमी आहेत. सीआरपीएफची ‘कोब्रा‘ नावाची अत्यंत कुशल कमांडो टीमवर हा हल्ला झाला. इम्प्रुव्हड एक्सप्लोजिव्ह डिव्हाईस (आयईडी) प्रकारचा हा स्फोट होता. या जिल्ह्यातील चकरबंद आणि डुमरिनाला जंगलात हा हल्ला झाला. गयाच्या सीमेवर हे जंगल आहे.
या घटनेत ८ जवान जागीच शहीद झाले तर दोघे उपचारासाठी नेले जात असताना मृत पावले. पोलिसांनी घटनास्थळावरून ग्रेनेड लाँचर, एके ४७ आणि आयएनएसएएस प्रकारच्या रायफल असा शस्त्रसाठा मिळाला आहे. माओवाद्यांशी जंगलात लढण्यासाठी अत्यंत कुशल असे कोब्रा टीम बनवण्यात आली आहे. कोब्रा टीमवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.