महाराष्ट्र राज्यात भात पिकाखाली सरासरी क्षेत्र 15.55 लाख हेक्टर इतके असून कोकण, पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात 15 जिल्ह्यामध्ये भाताची लागवड केली जाते. राज्याचे सरासरी भात उत्पादन 29.34 लाख मे टन असून सरासरी उत्पादकता 1887 किलो इतकी आहे. भात उत्पादन वाढीसाठी सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब वाढविणे आवश्यक असल्याने त्याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. यासाठी चारसुत्री, श्री पद्धत, यांत्रिकी पद्धत आणि गादीवाफ्यावरील टोकण पद्धत (डठढ) या सुधारित भात लागवड पद्धतींचा प्रसार करण्यात येत आहे.
श्री पद्धत तथा सघन भात लागवड पद्धत
भात रोपवाटिका गादीवाफ्यावर करावी व बी पेरण्यापूर्वी मातीत भरपूर सेंद्रिय पदार्थ वापरावेत. भात खाचरात जास्तीत जास्त सेंद्रिय खते, हिरवळीचे खते व पिकांच्या अवशेषांचा वापर करावा.
12 ते 15 दिवसांची रोपे लागवड करण्यात यावी. उशिरा किंवा जास्त वयाची रोपे लावल्यास अपेक्षित फुटव्यांची संख्या मिळणार नाही. भात रोपे तंतुमुळे न तुटता मातीसहीत, उथळ व सरळ लागवड करावी. त्यामुळे रोपे जमिनीत लवकर रुजतात, वाढ चांगली होते आणि फुटव्याचे प्रमाण वाढते. लवकर येणार्या जातींची 20 द 20 सें.मी. अंतरावर तसेच मध्यम व उशिरा कालावधीच्या वाणांची 25 द 25 सें.मी. अंतरावर प्रति चूड एक रोप लावून करावी.
प्राथमिक अवस्थेत श्री भात लागवड पद्धतीमध्ये अधिक तणाचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता वरचेवर कोनोविडरचा वापर करावा अथवा हाताने निंदन करावे. कमी खर्चात तणांचा बंदोबस्त करण्यासाठी रोवणीनंतर 3-5 दिवसांपर्यंत ब्युटॅक्लोर 50 ई.सी. 3.75 लिटर + 500 लिटर पाणी प्रति हेक्टरी याप्रमाणात वापरावे. तसेच 30 दिवसांनी कोनोविडरने मशागत करावी.
प्राथमिक अवस्थेत भात बांधित जमीन सतत ओली राहील याप्रमाणे नियंत्रित पाणी द्यावे.
फायदे :- बियाणाची बचत होते. प्रति हेक्टरी 5 किलो बियाणे पुरेसे आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा निम्म्यापेक्षा अधिक पाण्याची बचत होते पिकास अधिक प्रमाणात फुटवे येऊन ओंबीची लांबी व ओंबीमधील दाण्यांची संख्या अधिक असते.
वाणनिहाय पक्वता कालावधी कमी होतो व पीक साधारणत: एक आठवडा लवकर तयार होते. रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. प्रचलित पद्ध
सुधारित जातींच्या भाताची रोपे वाढविण्यासाठी भाताच्या तुसाच्या राखेचा रोपवाटिकेत वापर करणे – चुलीतून मिळणार्या राखेचा साठा खड्ड्यात एकत्रित करावा. गादीवाफ्यावर रोपांना सिलिकॉनचा पुरवठा करण्यासाठी प्रति चौ.मीटर क्षेत्रावरील मातीत राख मिसळावी. राख तयार करण्यासाठी भाताचे तूस शेगडीमध्ये पेटवून काळपट व भुरकट रंगाची राख मिळवावी. या राखेमध्ये भात रोपास पोषक असे अन्नद्रव्य अस्फटीक स्वरुपात असल्याने भात रोपांची वाढ दणकट व निरोगी होते.
पाण्यामध्ये भिजलेला भाताचा पेंढा हेक्टरी दोन टन (1 गुंठ्यास 20 किलो) या प्रमाणात खाचरांत पसरावा व पहिल्या किंवा दुसर्या नांगरटीच्या वेळी जमिनीत गाडावा. शक्य झाल्यास पेंढ्याचे दोन ते तीन तुकडे करावेत. त्यामुळे पेंढा लवकर कुजण्यास मदत होईल. पेंढा टाकल्यावर पावसाचे पाणी खाचरांत जमिनीच्या वर दोन बोटे उंच साठवावे म्हणजे जमिनीतील पेंढा लवकर कुजतो.
तीपेक्षा शाश्वत व 20 ते 30 टक्के अधिक उत्पादन मिळते.
शेतकर्यांनी शेतातील बांधावर आणि पडीक जागेवर गिरीपुष्पाचे जुनं खुंट अथवा वनखात्याकडून 2 महिन्यांची गिरीपुष्पाची रोपे घेऊन लावावित. गिरीपुष्पाच्या लागवडीकरिता 2 ते 6 सेंमी व्यासाच्या आणि 30 ते 100 सेंमी लांबीच्या जाड व जुन काड्या गिरीपुष्पाच्या झाडावरून कापून घ्यावा. लागवड करताना जाड कांड्या अथवा खुंट जमिनीत 20 सेंमी (8) खोलीपर्यंत लावावेत. कांड्यांना भरपूर मुळे यावीत याकरिता जमिनीखाली लावल्या जाणार्या कांडीच्या सालीवर चाकूने छोट्या खाचा कराव्यात. गिरीपुष्पाची 3 ते 4 पूर्ण वाढ झालेली झाडे शेतातील 1 गुंठा क्षेत्रासाठी 20 ते 30 किलो गिरीपुष्पाचा पाला पुरवू शकतात. ज्यामध्ये 3 % नत्र असते.
गिरीपुष्प वापरल्याने इतर सेंद्रिय खतापेक्षा कोणता महत्त्वाचा आर्थिक फायदा होतो :-
लागवडीसाठी कोणताही खर्च नाही, खुंट अथवा रोपे वनखात्याकडून मिळतात. ही झाडे शेतातील पडीक जमीन, बांध किंवा घराजवळील मोकळ्या जागेत लावून जुलै महिन्यात चिखलणीपूर्वी झाडाच्या फांद्या कापून शेतात पसरून ठेवाव्यात. 5 ते 7 दिवसांत पाने खाचरांत गळून पडतात. शेतात राहिलेल्या फांद्या घरी जाळण्यासाठी वापरता येतात. एकदा लावलेले झाड बहुवर्षीय असल्याने कित्येक वर्षे टिकते. दरवर्षी छाटून फक्त पाला शेतात घालवायचा असतो. त्यामुळे झाडाची उंची व जाडी वाढत नाही. 5 ते 6 फुटांपर्यंत झाड मर्यादित राहते. 3 ते 4 झाडे भात खाचरातील 100 चौ. मी. (1 गुंठा) क्षेत्रासाठी 20-30 किलोग्रॅम पाला पुरवू शकतात. भात रोपांना ब्रिकेट मधून नत्र उपलब्ध होण्याआधी पहिल्या 15 ते 20 दिवसांत गिरीपुष्पाच्या पानापासून 10 ते 12 किलो नत्र म्हणजेच 26 किलो युरिया मिळतो. हिरवळीच्या खतासाठी सध्या ताग किंवा धैंच्या वापरणे खूप खर्चिक झालेले आहे. (ताग व धैंच्या दर रु. 50 प्रति किलो) परंतु गिरीपुष्पाच्या पानांमुळे पैशाची बचत होते.