पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानविषयक धोरण कमकुवत आहे. दोन वर्षे प्रयत्न करूनही त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, अशी टीका माजी परराष्ट्रमंत्री व भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी केली. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी शनिवारी सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर केलेला हल्ला हा मोदी सरकारच्या धोरणाचाच परिणाम आहे.
सिन्हा म्हणाले की, आमचा मेंदू मृत झालेला आहे, पण आम्ही अजूनही सल्ला देऊ शकतो. मात्र, पाकिस्तानबाबतच्या मोदी सरकारच्या धोरणाला माझा विरोध असून तो आपण सार्वजनिकरित्या जाहीर करत आहे.
पाकिस्तानबाबत धोरण आखण्याचा आपल्याला अनुभव आहे. मात्र, मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नातून काहीच निष्पन्न झाले नाही, असे त्यांनी सांगितले.