कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच?

टीम इंडियाच्या नव्या कोचची जागा कुणाला मिळणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याविषयीचे संकेत दिले आहे.

सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या समितीसमोर गेल्या तीन दिवसापासून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे हे कोचपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. आता भारतीय क्रिकेट संघाची धुरा कुणाकडे द्यायची हे ठरणार आहे. संध्याकाळपर्यंत बीसीसीआय नव्या कोचच्या नावाची घोषणा कऱण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *