या ५ गोष्टी करा तुमचा कधी ब्रेकअप होणार नाही

सध्याच्या जमान्याच ब्रेकअप ही कॉमन गोष्ट झालीये. नातेसंबंधातील तणाव, दुरावा या ब्रेकअपला कारणीभूत ठरतो. मात्र काही नाती ही दृढ असतात. ही नाती टिकवून ठेवण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही तितकेच प्रयत्न करणे गरजेचे असते. एकमेकांना समजून घेणे, आनंदी ठेवणे या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचे नाते अधिक दृढ करु शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी. या ५ गोष्टी केल्य़ास तुमचा कधीही ब्रेकअर होणार आहे.

भांडण वाढू न देणे – कोणत्याही नात्यात हे मतभेद होतात. प्रत्येक व्यक्ती वेगळा असल्याने प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. त्यामुळे वाद होणारच मात्र हे वाद तुमच्या नात्यात दुरावा आणणार नाहीत याची काळजी घ्या.

त्य़ाचे कुटुंब हे माझे कुटुंब – ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पार्टनरचा सन्मान करता त्याचप्रमाणे त्याच्या अथवा तिच्या घरच्यांचाही तितकाच सन्मान करा.

मूड नेहमी खुश ठेवा – घरात अथवा ऑफिसमध्ये काम वाढल्यास त्याचा परिणाम आपल्या मूडवर होतो. ऑफिसमध्ये एखाद्याशी वाद झाल्यास त्याचा राग दुसऱ्याच व्यक्तीवर निघतो. त्यामुळे ऑफिसातील वादाचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर होणार नाही याची नेहमी काळजी घ्या. 

मला हक्क आहे – काही कामे अशी असतात की ती कामे तुम्हीच करावीत अशी पार्टनरची अपेक्षा असते. त्यामुळे काही कामांमध्ये हक्क दाखवा. 

निवांत क्षण घालवा – केवळ बोलण्यानेच सर्व समजतं असं नाही अनेकदा मनातील भाव हे न बोलताही समजतात. त्यामुळेच एकमेकांसोबत निवांत क्षण घालवा. यातून तुमचे नाते अधिक दृढ होईल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *