टिटवाळा दुहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना अटक

टिटवाळा दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. दारुसाठी पैसे न दिल्याने या पाच जणांनी राजू आणि मदन या दोघा भावांची हत्या केलीय.

राजू आणि मदन हे मुळचे नेपाळचे आहेत. राजू हा म्हारळमध्ये रहात होता तर मदन उल्हासनगरमध्ये. बुधवारी संध्याकाळी मदन राजूकडे आला होता. जेवण झाल्यानंतर राजू मदनला सोडण्यासाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही.

दुसऱ्या दिवशी या दोन्ही भावांचे मृतदेह राधाकृष्ण नगरी परिसरातील मोकळ्या जागेत सापडले. टिटवाळा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. आणि काही तासांतच या हत्येतील आरोपींना जेरबंद केलं.

दोघांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. स्टेशनकडे जाणाऱ्या राजूकडे त्यांनी पैशांची मागणी केली राजूने त्याला नकार दिल्यानं या पाचही जणांनी दोघांची हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *