हा सामान्य जनतेचा विजय: ममता बॅनर्जी

पश्चिम बंगाल राज्यामध्ये मिळालेल्या विजयाने आनंदी झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी यांनी आज (गुरुवार) हा सामान्य जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली.

या विजयामुळे बॅनर्जी या आता पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ सलग दुसऱ्यांदा घेणार असल्याचे निश्‍चित झाले. मुख्यमंत्रीपदाची शपथ आता येत्या 27 मे रोजी घेणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने आक्रमक प्रचार केला असला तरी आणि डाव्या पक्षांनी कॉंग्रेसला बरोबर घेतले असले तरी मतदारांचा कल ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसकडेच असल्याचे “सी-व्होटर‘ने घेतलेल्या कलचाचणीत दिसून आले होते. आजचे निकाल पाहता अशीच स्थिती असल्याचे दिसत आहे. डाव्या पक्षांची मतांची टक्केवारी वाढण्याची चिन्हे असली तरी त्याचा प्रत्यक्ष जागांवर फारसा परिणाम होण्याची शक्‍यता नाही. एकूण 294 जागांपैकी एकट्या तृणमूलला 212 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *