विहिरीतून पाणी काढताना मुलाचा मृत्यु

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचा आणखी बळी केला असून विहरीतून पाणी काढताना एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्‍यातील विडा येथे एक आज (गुरुवार) सकाळी एक 11 वर्षांचा मुलगा घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेला. दरम्यान पाणी काढताना विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यु झाला. बीड जिल्ह्यात रविवारी अशाच एका घटनेत एका शाळकरी मुलीचा मृत्यु झाला. बीड जिल्ह्यातील योगिता अशोक देसाई (वय 11) ही शाळकरी मुलगी आईसोबत हातपंपावरून पाणी आणण्यासाठी गेली होती. दरम्यान तीव्र उन्हात हंडा भरण्यासाठी अर्धा तास थांबावे लागण्याने तिचा उष्माघाताने मृत्यु झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *