सराफ बाजारात 500 कोटींची उलाढाल ठप्प

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याला सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो; पण सराफ बाजार बंद असल्यामुळे मुंबईकरांचा सोने खरेदीचा मुहूर्त हुकला आहे. दुसरीकडे कमाईचा दिवस असतानाही सराफांना दुकाने बंद ठेवून घरी बसावे लागले. त्यामुळे सराफ बाजारातील तब्बल 400 ते 500 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.   गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी नव्या वस्तूंची खरेदी करण्यात येते. प्रत्येकजण आपआपल्या ऐपतीनुसार सोन्याची खरेदी करतो. विशेष म्हणजे लग्नसराईचे दिवस असल्यामुळे अनेकजण गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून दागिन्यांची खरेदी करतात; पण यावेळी सराफ बाजार बेमुदत संपामुळे बंद असल्यामुळे अनेकांचा सोने खरेदीचा मुहूर्तच हुकला आहे. या संपाचा सराफांनाही मोठा आर्थिक फटका बसला असून करोडो रुपयांची उलाढाल ठप्प पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *