मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना जन्मठेप

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना जन्मठेप

मुंबईत २००२-०३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी टाडा विशेष न्यायालयाने बुधवारी दोषींना शिक्षा सुनावली.

प्रमुख दोषी मुझम्मिल अन्सारी, फरहान खोत आणि डॉ. वाहीद अन्सारी यांना जन्मठेप तर सिमीचे दहशतवादी साकीब नाचन, असीफ मुल्ला, अमील मुल्ला यांना १० वर्षांचा कारावास आणि अन्वर अली, मोहम्मद कमील, नूर मोहम्मद यांना २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

विशेष पोटा न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. आर. देशमुख यांनी सुनावणी दरम्यान या दोषींना दंड ही (एकूण ९ लाख) आकारण्यात आला आहे. त्यातील ७५ टक्के रक्कम जिल्हा कायदे सेवा प्राधिकरण आणि उर्वरित रक्कम भारतीय रेल्वेला देण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

डिसेंबर २००२ ते मार्च २००३ या काळात मुंबईतील मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले या रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणी न्यायालयाने गेल्या आठवड्यातच निकाल दिला. तिघांची पुरेश्या पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली. तर दहाजण दोषी ठरवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *