भारतीय संघाचे खेळाडू भारतीय झेंड्याचा योग्य पद्धतीने सन्मान राखत नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते पी उल्हास यांनी केला आहे. त्यांनी मोहाली पोलीस स्थानकात तशी तक्रार दाखल केली आहे.
‘हेल्मेटवर तिरंगा चिकटवणे योग्य नाही. भारतीय खेळाडू सामन्यादरम्यान आपले हेल्मेट मैदानात काढून ठेवतात. अनेकदा सामना सुरू असतांना काही खेळाडू मैदानात थुंकतात, तेथे हेल्मेट काढून ठेवणे म्हणजे भारतीय झेंड्याचा तो अपमान आहे,’ असे उल्हास यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने हेल्मेटवर तिरंग्याचा वापर करणे बंद केले आहे. मात्र विराट कोहलीसह इतर काही खेळाडू अजुनही भारताचा तिरंगा असलेले हेल्मेट वापरतात.
पी उल्हास यांनी सर्वप्रथम गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर जवळच्या पोलीस स्थानकात त्यांनी तक्रार केली. मात्र अद्याप यावर कोणतिही कारवाई करण्यात आलेली नाही.
पी उल्हास यांनी याआधी भारत आणि पाकिस्तान सामन्यात अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत चुकीचे गायले होते, अशी तक्रार दिली होती.