मुंबईत २००२-२००३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी टाडा विशेष न्यायालयाने निकाल दिला. यामध्ये १० जणांना दोषी ठरवले तर अन्य तीन जणांची निर्दोष सुटका करण्यात आली.
तब्बल १३ वर्षानंतर मंगळवारी टाडा न्यायालयाने हा निकाल दिला. दोषींवर बुधवारी होणा-या सुनावणीत शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
साकिव नाचन, फरहान मवीक, आतीफ, डै अन्सारी, नूर अली, नूर मोहम्मद, नासीर मुल्ला, गुलाम अकबर, मुजम्मील, नसीर अशी दोषींची नावे आहेत.
डिसेंबर २००२ ते मार्च २००३ या काळात मुंबईतील मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले या रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली होती.
१३ वर्षांनी न्यायालयाने हा निकाल दिला असून १० जणांना दोषी ठरविले आहे. तिघांची पुरेश्या पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली आहे.