अंत्यविधीसाठी बाटलीबंद पाणी!

अंत्यविधीसाठी बाटलीबंद पाणी!

मुंबईच्या अनेक भागात पाणीटंचाई जाणवत असताना त्यातून स्मशानभूमीही सुटलेली नाही. गोरेगाव येथील ओशिवरा हिंदू स्मशानभूमीतील वीजपंप बंद असल्याने मागील आठ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अंत्यविधीसाठी नागरिकांना चक्क बाटलीबंद पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे.

गोरेगाव पश्चिम येथील स्मशानभूमीत पाणी नसल्याने नागरिकांना फार मोठ्या गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. अंत्यविधीसाठी इतर सामानांबरोबरच नागरिकांना पाण्याच्या बाटल्याही आणाव्या लागत आहेत. अंत्यविधीनंतर नातेवाईकांना आंघोळीसाठी पाणी नसल्याने बाटलीतील पाणी अंगावर शिंपडून विधी पूर्ण केला जात आहे.

स्मशानातील पाण्याचा इलेक्ट्रिकचा पंप बिघडल्याने पाणीपुरवठा होत नसल्याची बाब येथील कर्मचाऱ्यांनी तसेच नाग‌रिकांनी के-पश्चिम कार्यालयाकडे कळविल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. शिवसेनेच्या नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर गुरूवारी एक टँकर स्मशानभूमीत पाठविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *