पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा मिळण्याऐवजी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण

पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा मिळण्याऐवजी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण

घामाच्या धारांनी वैतागलेल्या मुंबईकरांना शुक्रवारी सकाळी हलक्‍याशा पावसाने दिलासा दिला. सकाळी सातच्या सुमारास उपनगरातल्या कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा आणि परळ, वडाळा, दादर परिसरात पावसाने हजेरी लावली. पनवेलमध्येही जोरदार पाऊस पडला.

अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरण आहे. या पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा मिळण्याऐवजी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

मुंबईसह पुण्याच्या काही भागातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. लोणावळा, तळेगाव, देहूरोड या परिसरात गुरुवारी रात्री पाऊस पडला. तर कोकणातही रायगडमध्ये मुरुड, अलिबाग, नागोठणे भागात पाऊस झाला. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर चिखल साचल्याने खड्ड्यांमधून गाडी चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.

कोकणसह पुणे, नाशिक, अहमदनगर परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पाथर्जी, कर्जत, श्रीगोंदा, आणि पारनेर परिसरात रात्री वीजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही भागातील वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. या पावसामुळे ग्रामिण भागात मात्र गारवा निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *