नवीन रिक्षा दिसल्यास जाळून टाका

नवीन रिक्षा रस्त्यावर दिसल्यास चालक आणि प्रवाशांना रिक्षातून उतरुन रिक्षा जाळून टाका, असा धक्कादायक आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पक्षाच्या १० व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हा आदेश दिला आहे.

बजाज कंपनीत सत्तर हजार रिक्षा तयार आहेत, राहुल बजाज यांच्या कंपनीला फायदा व्हावा यासाठी सरकारने परवाने देण्याचा घाईघाईने निर्णय घेतला आहे. त्यामुळेच घाईघाईत परवाने वाटप सुरु आहे.

रिक्षा चालकांना ७० हजार परवान्यांचे वाटप करण्याची घाई कशाला? यातील ७० टक्के परवाने परप्रांतीयांना देणार आहेत. मग सर्वच्या सर्व ७० हजार परवाने मराठी मुलांना का नाहीत? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.

नविन बजाज रिक्षांसाठी हा ११९० कोटींचा व्यवहार झाला आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये बोलताना केला.

आपल्याला भरभरुन बोलायचे आहे, परंतू ते आपण गुढीपाडव्याच्या दिवशीच शिवतिर्तावर बोलू, असे ठाकरे यांनी सुरुवातीलाच सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *