‘रेणू’च्या 2 बछड्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक

औरंगाबादमधल्या सिध्दार्थ उद्यानात रेणू या बिबट्या मादीच्या दोन पिल्लांचा आज (बुधवारी) मृत्यू झाला.रेणूने काल तीन पिलांना जन्म दिला, मात्र त्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एका बछड्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न ‘सिद्धार्थ’ उद्यानातील डॉक्टर करत आहेत.

डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसातील आश्रमातून राजा आणि रेणू ही बिबट्याची जोडी दोन आठवड्यांपूर्वी ‘सिद्धार्थ’मध्ये आणली. इथल्या वातावरणाशी राजा एकरूप होऊ लागला, पण रेणूचे मन रमत नव्हतं. तिने अन्नही त्यागलं होतं. पिलांना जन्म देण्याआधीच रेणू आजारी होती. तिला गॅस्ट्रो, इनफेक्शन झालं होतं, पण तिने उपचारालाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिला पिल्लांना पाजता आलं नाही, म्हणून त्यांना बाहेरून दुध पाजण्यात आलं. पण प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांना त्यांना दोन पिल्लांना वाचवता आलं नाही. आता तिसर्‍या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसंच रेणूची प्रकृती ठीक असून तिनेही खाण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *