बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

बारावीची लेखी परीक्षा गुरुवार, १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यातील ८ हजार ८१८ कनिष्ठ महाविद्यालयातील १३ लाख ८८ हजार ४६७ विद्यार्थी बारावीला बसले आहेत. यात ७ लाख ८२ हजार १८१ विद्यार्थी आणि ६ लाख ६ हजार २८६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. तर कोकण विभागातून ३३ हजार ५३ विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून ही परीक्षा एकूण ५३ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.

ही परीक्षा २८ मार्च या कालावधीपर्यंत चालणार आहे. माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून यासाठी १ लाख ६०९ विद्यार्थी परीक्षा देतील, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली. या परीक्षेसाठी राज्यात २५२ भरारी पथके नेमली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *