बस चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने एसटीला भीषण अपघात झाला असून यामध्ये चालाकाचा मृत्यू झाला तर ३० प्रवासी जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पन्हाळा तालुक्यातील नावली गावाजवळ घडली.
बाबुराव सावंत असे एसटी चालकाचे नाव असून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळच्या वेळेस मीरज-गणपतीपुळे एसटी निघाली होती. सावंत यांना काही वेळाने अचानक त्रास होऊ लागला. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याच्या तोंडातून फेस यायला लागला.
त्यामुळे सावंत यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस समोर असलेल्या झाडाला जाऊन आदळली.
या अपघातात ३० जण जखमी झाले असून त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.