राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने यजमानपद स्वीकारलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहंतर्गत ‘महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्र रजनी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी गिरगाव चौपाटीवर सुरू असताना अचानक कार्यक्रमाच्या मंचाला भीषण आग लागली.
या आगीची तीव्रता एवढी भयानक होती की काही क्षणातच संपूर्ण मंच जळून राख झाला. आग लागली तेव्हा मंचासमोर ६० देशातून सहभागी झालेले परदेशी पाहुणे तसेच राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विविध क्षेत्रातील नामवंत माणसे उपस्थित होते. या आगीमुळे मेक इन इंडिया कार्यक्रमातील सुरक्षेबाबत प्रश्नचिंन्ह उभे निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ या सप्ताहांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून रविवारी संध्याकाळी गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणा-या महाराष्ट्र रजनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला ६० देशातील परदेशी पाहुणे आणि महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते.
गिरगाव चौपाटीवर मोठया दिमाखात या कार्यक्रमाची सुरूवात झाली. मात्र प्रसिध्द अभिनेत्री पुजा सावंत यांच्या लावणीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक येथील मंचाच्या प्रथम दर्शनी भागात आग लागली.
या आगीची तीव्रता एवढी होती की पाहता पाहता काही क्षणाच ही आग वा-यासारखी सर्वत्र पसरली. आणि संपूर्ण मंचच आगीच्या विळख्यात सापडला. सदुर्देवाने आग इतरत पसरण्यापूर्वीच मंचावर खेळ सादर करणा-या सर्व कलाकारांना सुखरुप मंचावरुन बाजुला सुरक्षित स्थळी स्थळी आणण्यात आले.
आगीची वार्ता समजताच घटनास्थळी दक्ष असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या बंबानी मंचाचा ताबा घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही क्षणातच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या १४ फायर इंजिन, ५ वॉटर पंप घटनास्थळी रवाना झाले होते. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही मनुष्यहानी झाली नसून मंचाचे मात्र कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.