काश्मीरमधील पूरग्रस्तांना 47 रुपयांचे धनादेश

जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या भीषण पूरात नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारकडून अवघे 47 रुपयांचे धनादेश देण्यात आले आहेत. नागरिकांना हे धनादेश सरकारला परत केले आहेत.
 
कृषी मंत्रालयाने जम्मूजवळील सरुरा गावातील शेतकऱ्यांना पूरात नुकसान झाल्याने 47 रुपयांपासून 378 रुपयांपर्यंतचे धनादेश देण्यात आले आहेत. तर, काही शेतकऱ्यांना 80 व काहींना 94 रुपयांचे धनादेश मिळाले आहेत. 
 
काश्मीरमध्ये गेल्यावर्षी आलेल्या भीषण पुरात 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. पुरात श्रीनगर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. सोमवारी केंद्र सरकारने काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी 400 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *