ठाण्यात आज आणि उद्या पाणी पाणीपुरवठा बंद

ठाण्यात आज आणि उद्या पाणी पाणीपुरवठा बंद

नियोजनासाठी ठाणे जिल्ह्य़ात शनिवार-रविवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल.

ठाणे जिल्ह्य़ात प्रामुख्यानं पाणीपुरवठा होणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणात जेमतेम असलेल्या जलसाठय़ाचं अधिक काटेकोरपणे नियोजन व्हावं यासाठी आता संपूर्ण जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा  बंद ठेवण्यात येईल.

सध्या प्रत्येक शहरात निरनिराळ्या दिवशी पाणीकपात सुरू आहे. त्यात अधिक सुसूत्रता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, आठवडय़ातील दोनऐवजी तीन दिवस पाणी बंदीचं संकट मात्र तूर्तास टळलंय. येत्या सहा ६ फेब्रुवारीपासून पाणीकपातीचं नवं वेळापत्रक लागू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *