राज्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना २०० कोटींचा निधी देण्यात आला असून तो तातडीने शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या विशेष निधीतून कोकण विभागाला ६९ कोटी ८५ लाख रुपयांची मदत दिली जाणार असून प्रामुख्याने कोकणातील आपदग्रस्त आंबा आणि काजू उत्पादकांना मदत मिळणार आहे. याशिवाय रब्बी हंगाम २०१४-१५ मधील बाधित शेतकऱ्यांना कृषी पिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अर्थसहाय्य करण्यासाठी विभागीय आयुक्त, नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर यांना ३६४.२८ कोटी निधीचे वितरण करण्यात आले आहे. शासनाच्या या मदतीमुळे सर्व बाधित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.