प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात सतर्कतेचा आदेश दिला असतानाच पोलिसांनी बडोद्यात मुंबईच्या सहा संशयितांना ताब्यात घेतले. स्थानिकांनी त्यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती दिल्यावर ही कारवाई करण्यात आली.
याकूतपुरा या संवेदनशील भागातील दग्र्यातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. सर्व जण रविवारी सकाळीच रेल्वेने बडोद्याला आले असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. शफी सय्यद दादा दर्गा येथून पकडण्यात आलेल्या या सहा जणांकडून आक्षेपार्ह काहीही आढळले नसले तरीही पोलीस त्यांच्या दाव्याची सत्यता तपासून पाहत आहेत. महंमद सलीम, महंमद अहमद रझा, शेख महंमद शाबिद, महंमद जमिल, महंमद सय्यद रेहान आणि समाधान काकडे अशी त्यांची नावे आहेत.